मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या निकालात भाजपने सहाव्या यशस्वी खेळी करत विजय मिळविला. त्यांनततर मुंबईतील भाजप कार्यालयात जोरदार सेलिब्रेशन केलं.दरम्यान, मुंबई मनपात सत्तेत असलेल्या शिवसेनेकडून कंगना राणौत, नारायण राणे, मोहित कंबोज, नवनीत राणा यांच्या घरांना नोटीस बजावण्यात आली होती. आता याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.
केवळ बदल्याची भूमिका घेऊन याचं घर पाड.. त्याचं घर पाड… मी तर नशिबवान आहे माझं मुंबईत घरंच नाहीये. मला नोटीस दिली तर सरकारी बंगल्यालाच मिळेल. नाहीतर मलाही नोटीस आलीच असती. मुंबईत घर नसल्यामुळे आणि नागपुरातील घर तंतोतंत नियमात असल्यामुळे मला नोटीस आलेली नाही. ही पद्धत योग्य नाही. केवळ सरकार चालवण्यासाठी, पदांसाठी सरकार चालवायचं. समाजातील एकाही घटकाचा विचार करायता नाही ही अवस्था आज पहायला मिळते ती अत्यंत खराब आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यसभेच्या निवडणुकीत झालेला आपला विजय हा खरे आपले लढवयै आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पित केला पाहिजे. कारण, शआरीरिक स्थिती नसताना देखील प्रचंड रिस्क घेऊन ते इथं आले. माझ्या पक्षाला आवश्यकता आहे आणि काही झालं तरी मतदान करणारच या भावनेतून त्यांनी मतदान केलं. त्यांच्यामुळे आपली तिसरी जागा व्यवस्थित निवडून आली. त्यामुळे त्यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो.