सावदा, ता. रावेर | रावेर तालुक्यात बुधवारी सायंकाळी वादळी वार्याने जोरदार तडाखा दिला. या तडाख्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान वादळी वार्यामुळे तुटून पडलेल्या विजेच्या तारांचा धक्का लागल्याने खिरोदा येथे एका बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.
खिरोदा येथील बाहेरपुरा भागातील रहिवासी असणार्या अफसर अजित तडवी याच पाच वर्षाच्या बालकाचा विजेच्या धक्क्याने अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली. काल वादळात पडलेल्या तारांना त्याचा स्पर्श झाल्याने या चिमुकल्याला प्राण गमवावा लागल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.
हे पण वाचा :
खुशखबर.. मान्सून पुढच्या ४८ तासांत महाराष्ट्रात दाखल होणार : IMD अंदाज
‘या’ अभिनेत्री केवळ अभिनयापुरत्या मर्यादित नसून अशा गोष्टी एकत्र करतात
इंडिया फोर्ब्ज ने घेतली डॉ.भूषण मगर यांच्या कार्याची दखल
जळगाव जिल्ह्यात ३ दिवस वादळी पावसाचा अंदाज
दरम्यान. या प्रकरणी सावदा पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. तर, महावितरणने तातडीने खाली पडलेल्या तसेच लोंबकणार्या तारांची दुरूस्ती करावी अशी मागणी होत आहे.