मुंबई : मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील शेतकरीसह सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे येत्या दोन दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या ४८ तासांमध्ये मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, गोवा, दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटकचा आणखी काही भागात मान्सून पुढे सरकरण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे पुढच्या दोन दिवसांमध्ये राज्यात मान्सूनचं आगमन होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
मान्सून अरबी समुद्रातच रेंगाळला असल्यामुळे राज्यात पावसाचे आगमन उशिरा होत आहे. पण अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस झाला. पण तोही हवा तसा झाला नाही. आज हवामान खात्याकडून राज्यातील २७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उद्यापासून (ता. १०) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा (Heavy Rain) अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हे पण वाचा :
‘या’ अभिनेत्री केवळ अभिनयापुरत्या मर्यादित नसून अशा गोष्टी एकत्र करतात
इंडिया फोर्ब्ज ने घेतली डॉ.भूषण मगर यांच्या कार्याची दखल
जळगाव जिल्ह्यात ३ दिवस वादळी पावसाचा अंदाज
विधान परिषद निवडणूक : अखेर एकनाथ खडसेंचे राजकारणात पुनरागमन, राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर
बारावी पास झाल्याने मित्रांसोबत सेलिब्रेशनला गेला, अन्..
सध्या मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पुण्यात आणि घाटमाथ्यावर ढगाळ वातावरण असून पावसाची रिपरिप सुरू आहे. पण उद्यापासून या शहरांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावू शकतो. मुंबईसह, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे जळगाव, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे वगळता महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट दिला आहे.