जळगाव : उष्माघातामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव हरीविठ्ठल नगरात घडली. किशोर ज्योतिराम खलपे असे 37 वर्षीय मृताचे नाव आहे. याप्रकरणी जळगाव शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
किशोर ज्योतिराम खलपे हे धरणगाव येथील रहिवासी सून ते जळगाव येथे राहत असलेल्या बहिणीकडे आले होते. मृत किशोर खलपे हे मजुरीचे काम करायचे. त्यांच्या बहीण जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरात राहतात. त्यामुळे मागील 15 दिवसांपासून किशोर त्यांच्या बहिणीकडे हरीविठ्ठल नगरात आले होते. गुरुवारी दिवसभर त्यांनी काम केले.
यानंतर सायंकाळी सहा वाजता रिक्षा थांब्याजवळ चक्कर येऊन ते कोसळले. यानंतर नातेवाईकांनी लगेचच त्यांना वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलविले. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी रात्रीच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाला अशी नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.
हे पण वाचा :
सर्वांसाठीच खुशखबर! मान्सून अखेर केरळमध्ये दाखल, पुढील आठवड्यात महाराष्ट्र्रात धडकणार
दिशा पटानीचा किलर लूक पाहून चाहते घायाळ !
महाराष्ट्र हरला ! अंघोळ करताना अल्पवयीन मुलीला बाथरूम मधून फरपटत शेतात नेत केला बलात्कार