मुंबई : महाराष्ट्रातील 48 खासदारांनी 2019 पासून आतापर्यंत किती टक्के विकासनिधीचा खर्च केला आहे याबाबतची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार 2019 पासून आतापर्यंत खर्च करण्यात आलेल्या विकासनिधीपैकी सर्वाधिक खर्च हा भाजपच्या जळगाव येथील खासदाराने केला आहे. तर भाजपचा एक खासदार असाही आहे ज्याने आतापर्यंत एक रुपयाचा विकासनिधीही खर्च केला नाहीये.
17व्या लोकसभेतील महाराष्ट्रातील खासदारांना जो विकासनिधी मिळाला आहे त्यापैकी केवळ 45.38 टक्के निधिच आतापर्यंत खर्च करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. जळगावचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी आतापर्यंत सर्वाधिक विकासनिधी खर्च केला आहे. त्यांनी आपल्या विकासनिधी पैकी तब्बल 97.30 टक्के विकासनिधी खर्च केला आहे. तर भाजपच्याच खासदार बीडच्या प्रीतम मुंडे यांनी आपल्या विकासनिधी पैकी एक रुपयाही खर्च केलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. दिव्य मराठीने या संदर्भात वृत्त दिलं आहे.
कुठल्या खासदाराने सर्वात कमी केला निधी खर्च?
बीडच्या भाजपच खासदार प्रीतम मुंडे (मंजूर निधी – 2.5 कोटी, खर्च निधी टक्केवारी – 00 टक्के)
सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेशवर महाराज (मंजूर निधी – 5 कोटी 50 लाख, खर्च निधी टक्केवारी – 9.10 टक्के)
सांगलीतील भाजपचे खासदार संजयकाका पाटील (मंजूर निधी – 5 कोटी 39 लाख, खर्च निधी टक्केवारी – 13.67 टक्के)
जालना भाजपचे खासदार रावसाहेब दानवे (मंजूर निधी 2.5 कोटी 45 लाख, खर्च निधी 16.1 टक्के)
मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे (मंजूर निधी 5 कोटी 1.20 लाख, खर्च निधी 22.3 टक्के)
यवतमाळ-वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी (5 कोटी 1.10 लाख, खर्च निधी 22.12 टक्के)