जळगाव – तालुक्यातील दापोरा येथे आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास एका ६० वर्षीय शेतमजुराने गिरणा नदी काठच्या बांधावरील निंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान आत्महत्या ऍक्सीडेन्ट झाल्याने आणि पॅरालिसिसचा झटका आल्याने ते आजाराने ग्रस्त असल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याबाबत माहिती अशी कि , दापोरा गावात मुरलीधर सुकलाल साठे वय ६० हे मजुरीचे काम करतात . आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास शौचाला जाऊन येतो असे सांगून ते घराबाहेर पडले . मात्र ते न आल्याने घरच्या मंडळींनी त्यांचा शोध घेतला असता गिरणा नदीच्या काठाला लागून असलेल्या निंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने त्यांनी गळफास घेतला असल्याचे आढळून आले. यामुळे नातेवाईकांनी घटनांसाठी एकच आक्रोश केला . तसेच याबाबतची माहिती पोलीस पाटील जितेश माधवराव गवंदे यांनी तालुका पोलीस स्टेशनला कळविल्यानंतर घटनास्थळी तात्काळ पोलिसांनी धाव घेत पंचनामा करण्यास सुरुवात केली . दरम्यान मृत मुरलीधर साठे यांच्या पश्चात पत्नी , नाशिक येथे मोठा मुलगा आणि जैन इरिगेशन येथे कामास असलेला दुसरा मुलगा ,सुना नातवंडे असा परिवार आहे. मुरलीधर साठे यांनी आजाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती पुढे येत आहे . याबाबत तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते . पुढील तपास पोलीस उप निरीक्षक तडवी व इतर कर्मचारी करत आहेत.