पुणे | बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला चक्रवात विरल्यानंतर पुन्हा तेथे कमी दाबाचा पट्टा निर्माण हाेत आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
उद्या मंगळवारपासून पुन्हा मध्य महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. या काळात मध्य महाराष्ट्र, काेकण आणि गाेव्यात पाऊस तर विदर्भात तीव्र उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे. त्यातच आता १९ ते २२ एप्रिल दरम्यान उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे.