जळगाव : नुकताच भारतीय जनता पार्टीच्या ४२ व्या वर्धापनदिन पार पडला. याचनिमित्त जुने जळगांव येथील वीर जवान गृपचे संस्थापक अध्यक्ष राहुल पाटील सोबत तब्बल ५० तरुण कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
पक्षाचे विचार तळागाळा पर्यत पोहचावे – आ. महाजन
या सगळ्यांनी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. दरम्यान,पक्षाचे विचार तळागाळा पर्यत पोहचावे, तसेच केंद्रातील मोदी सरकारने सामान्य जनतेसाठी दिलेल्या योजनांचा लाभ या साठी जनजागृती करावी असे आवाहन माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी जळगांव शहराचे आमदार राजुमामा भोळे, दिपक सुर्यवंशी, आरोग्यदूत अरविंद देशमुख, युवा मोर्चा सरचिटणीस जितेंद्र चौथे, मिलिंद चौधरी, भूषण भोळे व इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.