जळगाव प्रतिनिधी | बारावीचा हिंदीचा शेवटचा पेपर देऊन दुचाकीने घरी परत येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा दुचाकींचा अपघात होऊन त्यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर दोघे जखमी झाल्याची घटना मंगळवारी वाकोदजवळ महामार्गावर घडलीय.
व्यंकटेश सुधाकर सपकाळे (वय २४, रा. भुरे मामलेदार प्लॉट, शिवाजीनगर) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तर त्याच्या सोबत असलेले धीरज हिरालाल शिरसाठ (वय २३, रा. शिवाजीनगर) व करण सतीश भगत (वय २२, रा. सुरत) हे दोघे जखमी झाले.
व्यंकटेश, धीरज व करण हे तिघे मंगळवारी सकाळी सात वाजता सिल्लोड येथील गोसेगाव येथे एका महाविद्यालयात दुचाकीने (एमएच १९ बीपी ७७९९) ट्रिपल सीट परीक्षेला गेले होते. तिघे बारावीत असून, त्यांचा हिंदीचा पेपर होता. पेपर संपल्यानंतर तिघे जळगावकडे येण्यासाठी निघाले. वाकोदपासून काही अंतर पुढे आल्यानंतर त्यांच्या पुढे चालत उर्वरित. पान ४