
जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी आज मतदार संघात मतदारांच्या भेटी घेत तुमची साथ हवी आहे. जात-पात न मानता केवळ विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीच्या माध्यमातून मी ही निवडणूक लढवत आहे असे अवाहन करीत मतदारांशी संपर्क साधला.
महापालिकेतील ज्या सत्ताधाऱ्यांना तुम्ही महापालिकेच्या ५७ जागांवर विजयी केलं त्या लोकांनी तुम्हाला त्याबदल्यात काय दिलं? रस्ते, पाणी, आरोग्य ह्या मूलभूत समस्या आजही जळगावकरांना मिळत नाहीयेत. याचा हिशोब मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना विचारतोय पण तुम्ही देखील मतदानातून दाखूवून द्या असे देखील अभिषेक पाटील यांनी मतदारांशी संवाद साधतांना म्हटले.