मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. कारण महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून आमदार निधीवरून वाद पेटला आहे. आता अशातच काँग्रेसचे २५ आमदार नाराज असून, आपल्या व्यथा मांडण्यासाठी सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली आहे.
एकीकडे भाजपचे नेते सरकार पाडण्याचा मुहूर्त देत आहे. तर दुसकीकडे आता काँग्रेसचे आमदार महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याचे वृत्त समोर आले आहे. अलीकडेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांनी निधी देण्याबाबत घोषणा केली आहे. पण, काँग्रेसच्या आमदार अजूनही नाराज आहे.
काँग्रेसचे 25 आमदार सरकारवर नाराज आहे. आपल्या व्यथा मांडण्यासाठी सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. याबद्दल एक पत्रही सोनिया गांधींना लिहिण्यात आले आहे, असं वृत्त हिंदूस्तान टाईम्सने दिले आहे.
इकोनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारमधील काही मंत्री आपलं म्हणणं ऐकत नाही. काँग्रेसचे मंत्री सुद्धा आपलं ऐकत नाही. जर मंत्री आमदारांच्या मतदारसंघातील समस्येबाबत ऐकणार नसतील तर भविष्यात मतदारसंघात कसं काम करायचे? असा सवालच आमदारांनी उपस्थितीत केला आहे.














