जळगाव : यंदा मार्च महिन्यातच उन्हाचे चटके बसू लागले आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशावर गेल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. दरम्यान, हवामान विभागाने राज्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून अशातच जळगावमध्ये उष्माघाताचा पहिला बळी ठरला आहे. अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे उष्माघातामुळे ३३ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. जितेंद्र संजय माळी (वय ३३) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून या प्रकरणी अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जितेंद्र माळी दुपारपर्यंत रस्त्यावर खमंग विकले आणि त्यानंतर शेतात कामाला गेले होते. शेतातून काम करून येत असताना उन्हाचा फटका बसला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.
हे पण वाचा :
खुशखबर ! १ एप्रिलपासून राज्यातील कोरोना निर्बध हटवणार, आरोग्यमंत्र्यांची माहिती
ही भोजपुरी अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत, साडी घालून केले फोटो शेअर
३१ मार्चनंतर ‘या’ स्मार्टफोनमध्ये चालणार नाही व्हॉट्सअॅप, कुठेतरी तुमचा फोन समाविष्ट नाही
धक्कादायक ! पार्टीच्या बहाण्याने बोलावून दिग्दर्शकाने केला अभिनेत्रीवर बलात्कार
ऑटोवाल्याचा मूर्खपणा भोवला ; जळगावात पोलीस व्हॅनची कारला धडक, घटना सीसीटीव्हीत कैद
या प्रकरणी अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उष्माघात सदृश्य लक्षणे असल्याने जितेंद्र माळी यांचा मृत्यू झाला असं स्थानिक डॉक्टरांचे म्हणणं आहे. तर मेंदूतून रक्तस्त्राव झाल्याची अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर आशिष पाटील यांनी माहिती दिली. दरम्यान, माळी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यावर योग्य तो खुलासा होईल.














