सुरेश भोळे यांना लाखांच्या मताधिक्क्याने विजयी करण्याचा निर्धार
जळगांव – जळगांव शहर महानगरपालिकेला हुडकोसह जिल्हा बँकेच्या कर्जातून मुक्त करुन विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणणार्या आ. सुरेश भोळे यांना विधानसभा निवडणूकीत लाखाच्या मताधिक्क्याने विजयी करण्याचा निर्धाऱ कार्यकत्यांनी ़केला आहे.तत्कालीन न.पा. ने घरकुलांसाठी हुडको तसेच जिल्हा बँकेकडूनही कोट्यवधींचे कर्ज घेतले होते. या कर्जाची वेळेवर परतफेड न झाल्याने महापालिकेवर कर्जाच्या व्याजाचा बोझा हिमालयासारखा वाढत होता. अनेकदा डी.आर.डी. न्यायालयाने महापालिकेचे बँक खातेही सील केले होते. सुरेश भोळे हे नगरसेवक असतांना त्यांना याची जाणीव होती. या जाणिवेतून आणि शहराच्या विकासासाठीचा पण करित त्यांनी ना. गिरीष महाजन, माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली 2014 ची विधानसभा निवडणूक जिंकली. जळगांव शहर महानगरपालिकेचे नगरसेवक असलेले सुरेश भोळे हे शहराचे आमदार झालेत. आमदार झाल्याने त्यांच्याकडून जळगांवकरांच्या अपेक्षाही अधिक वाढल्या होत्या. त्यांनीही या दिशेने नियोजनपूर्वक काम करित शहरवासियांच्या अपेक्षांची पूर्तता केली आहे.
विकासाची घोडदौड – एकीकडे महापालिकेस कर्जमुक्त करित असतांना दुसरीकडे ना.गिरीष महाजन, आ.एकनाथराव खडसे, ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शहराच्या विकासासाठी निधी मिळाल्याबाबत केलेल्या पाठपुराव्यास यश येत त्यांनी कोटयावधींचा निधी जळगांव शहरासाठी आणला.
मुलभूत समस्यांकडे लक्ष – खड्डेमय झालेले शहरातील रस्ते, वाघुरची जुनी पाईपलाईन बदलवण्यासाठी केंद्राच्या अमृत योजनेत जळगावचा केलेला समावेश तर भुयारी गटारीसाठी आणलेला कोटयवधींचा निधी हे त्यांच्या स्वप्नपूर्तीचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. गेल्या चाडेचार वर्षात केलेल्या पाठपुराव्याने आमदारकीची टर्म संपविण्याचा आतच जळगाव शहराला कोटयवधींचा निधी मिळाला. यातून आता मुलभूत समस्या महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने सोडविण्यात येणार आहे.
लाखोंचे मताधिक्य देणार – सुरेश भोळे यांनी शहरासाठी आणलेला भला मोठा निधी आणि महापालिकेची केलेली कर्जमुक्ती या बाबी लक्षात घेता त्यांनी शहरात आणखी विकासकामे करावीत यासाठी कार्यकत्यांनी त्यांना या निवडणूकीत लाखांच्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला आहे.
आमदारकीच्या कार्यकाळातच कर्जमुक्तीचे यश – सुरेश भोळे यांना जळगांवकरांनी 2014 मध्ये आमदार म्हणून पसंती दिली. आमदारकीचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आतच त्यांनी कर्जाच्या खाईत असलेल्या महापालिकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. गिरिष महाजन, आ.एकनाथराव खडसे, महसूल आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे गेल्या चार वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करित जिल्हा बँक व हुडकोच्या कर्जाबाबत चर्चाच्या अनेक फेर्या केल्यात. त्यातून राज्य शासनाने हुडकोच्या कर्जाची 250 कोटीची रक्कम मनपास वर्ग केली. महापालिकेने ती हुडकोकडे भरुन कर्जमुक्त होण्याचा आनंद घेतला.














