जळगाव : शिवाजी नगरातील स्मशानभूमीजवळ रेल्वेचा धक्का लागल्याने ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. सागर अरूण सरोदे (वय-३०) रा. श्रीकृष्ण नगर, जळगाव असे मयत तरूणाचे नाव असून याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील श्रीकृष्ण नगरात वास्तव्यास असलेला सागर सरोदे हा गुरूवारी ३ फेब्रुवारी रोजी पहाटे घरात काहीही न सांगता निघून गेला होता. सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास शिवाजी नगरातील स्मशानभूमीजवळील रेल्वे रूळावर धावत्या रेल्वेचा जोरदार धक्का लागल्याने सागरचा जागीच मृत्यू झाला आहे.
जळगाव रेल्वे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. खिश्यातील कागदपत्राच्या आधारे सागरची ओळख रेल्वे पोलीसांकडून ओळख पटविण्यात आली. खासगी वाहनाने जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात मृतदेह आणण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी रूग्णालयात आक्रोश केला होता तर नातेवाईक आणि मित्रमंडळींची मोठी गर्दी जमली होती. मयताच्या पश्चात आई उषाबाई, वडील अरूण नथ्थू सरोदे, मोठा भाऊ हर्षल आणि विवाहित बहिण असा परिवार आहे. जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ रामराय इंगळे आणि पोलीस कॉन्स्टेबल किशोर पाटील हे करीत आहे.