मुंबई – महाराष्ट्र राज्य मंडळाच्या १० वी ,१२ वी च्या परीक्षाबाबत विद्यार्थी, पालकांमध्ये असणारा संभ्रमअखेर दूर झाला असून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांन परीक्षाबाबत अधिकृत घोषणा केली आहे.त्यामुळे आता नियमित मूल्यमापन पद्धतीने ऑफलाईनच परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटर हॅण्डल वरून माहिती देत सांगितलं आहे की,विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सर्व काळजी घेऊन या परीक्षा नियमित पद्धतीने होणार आहेत .
महाराष्ट्र राज्य मंडळाची दहावीची परीक्षा १५ मार्च २०२२ ते १८ एप्रिल २०२२ दरम्यान पार पडणार आहेत. बारावीच्या लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ दरम्यान होणार आहेत. इयत्ता १२ वीचा निकाल जून २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आणि इयत्ता दहावीचा निकाल जुलै २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्यात येणार आहेत.
नमस्कार विद्यार्थी व पालक हो,
सर्व संबंधित घटकांशी, शिक्षणतज्ज्ञांशी विचारविनिमय केल्यानंतर उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) व माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक आम्ही जाहीर करत आहोत.#SSCexams #HSCexams @msbshse @CMOMaharashtra @MahaDGIPR pic.twitter.com/ZWwQoKAbV8— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 16, 2021