रावेर : तालुक्यातील कांडवेल येथील ४५ वर्षीय शेतकऱ्याने नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने आपल्या शेतमालाचे नुकसान सहन न झाल्याने शेतात जाऊन विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव निवृत्ती नारायण पाटील (वय ४५) असे आहे.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील कांडवेल येथील निवृत्ती नारायण पाटील (वय ४५) यांनी आपल्या शेतातील तीन एकरात कपाशीची लागवड केली होती. परंतु अतिवृष्टीमुळे शेतातील पिक जमीनदोस्त झाले. यंदाचा हंगामाच वाया गेल्याने पाटील कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली. यातून आलेल्या नैराशातून त्यांनी शेतात जाऊन कपाशीवरील फवारणीचे औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. त्यांच्या पाश्च्यात लहान दोन मुले आहे.