मुंबई: बंगालच्या उपसागरातील कमी दा़बाच्या क्षेत्राचा प्रभावामुळे महाराष्ट्रात पुढील दोन दिवसात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. तर, हवामान विभागानं काही जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी केला आहे.
राज्यात गेल्या आठवड्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली होती. यादरम्यान, राज्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. परंतु आता बंगालच्या उपसागरातील कमी दा़बाच्या क्षेत्राचा प्रभावामुळे महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात पुढचे 2 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दा़बाच्या क्षेत्राचा प्रभावामुळं विदर्भ, सलंग्न मराठवाडा भाग आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस होईऊ शकतो. त्यामुळं नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
कोणत्या तारखेला कुठे पडणार पाऊस?
16 ऑक्टोबर- नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड जालना, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
17 ऑक्टोबर- नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड जालना, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली, भंडारा गोंदिया, औरंगाबाद, बीड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस
प्रादेशिक हवामान विभाग केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.