मुंबई, (प्रतिनिधी)– बेळगाव महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे. पण, त्याच वेळी या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा दारुण पराभव झाला आहे.
बेळगाव महापालिकेच्या यशा नंतर भाजपकडून महाराष्ट्रात विजयाचा आनंद व्यक्त केला जात असताना दुसरीकडे शिवसेनेकडून मात्र जोरदार टीका करण्यात आली आहे.
यासंदर्भात बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील भाजपवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. मराठी माणूस बेळगावमध्ये हरल्याबद्दल तुम्ही पेढे वाटत आहात, लाज नाही वाटत तुम्हाला? असा संतप्त सवालच संजय राऊत यांनी भाजपला केला आहे.