मुंबई, (प्रतिनिधी)- बेळगाव निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर भाजपाला मिळालेल्या यशाचे भाजपात जोरदार जल्लोष होतं असतांना भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी थेट शिवसेनेला आव्हान देत ट्विट केलं आहे.आगामी मुंबई महापालिका निवडणुक बाबत हे मोठं विधान मानल्या जात आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवर ट्विट केलं आहे की, “बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई बाकी आहे, हे तर नक्कीच आहे आणि ती आम्ही सोडणार नाही. हैदराबाद निवडणुकीत एक-दोन नगरसेवकावरून आम्ही थेट ५१ वर पोहोचलो. तेव्हाच आम्ही सांगितले होते, ज्या स्टाईलने आम्ही हैदराबाद लढलो, त्याच स्टाईलने मुंबई लढणार ! असं म्हटलं आहे.
बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई बाकी आहे, हे तर नक्कीच आहे आणि ती आम्ही सोडणार नाही. हैदराबाद निवडणुकीत एक-दोन नगरसेवकावरून आम्ही थेट ५१ वर पोहोचलो. तेव्हाच आम्ही सांगितले होते, ज्या स्टाईलने आम्ही हैदराबाद लढलो, त्याच स्टाईलने मुंबई लढणार !
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) September 6, 2021
या ट्विट वरून भाजपानं स्पष्ट केलं आहे की आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक पूर्ण ताकदीनी लढवून मुबंई महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवायचा आहे हे निश्चित झाले आहे. त्यासाठी भाजपा हैद्राबादच्या निवडणुका ज्या स्टाईल ने लढली त्याच स्टाईल ने मुंबई महापालिका निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट देखील या ट्विटच्या माध्यमातून भजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.