जळगाव प्रतिनिधी । शहरातील तुळजाई नगरमध्ये राहणाऱ्या वंदना गोरख पाटील (वय 42) या महिलेचा गळा आवळून आणि चेहऱ्यावर घाव घालून खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी घटनास्थळी एमआयडीसी पोलिसांनी धाव घेतली असून तपास सुरु आहे.
मयत महिला भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होती. महिलेचा खून कशासाठी झाला हे अद्याप समजून आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस कर्मचारी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे