नवी दिल्ली : देशातील नव्या कोरोना रुग्ण संख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. मागील गेल्या 24 तासात 25 हजार 72 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 389 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी 44 हजार 157 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे देशातील सक्रिय रुग्णसंख्या सध्या साडेतीन लाखांच्या खाली गेली आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 24 लाख 49 हजार 306 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 16 लाख 80 हजार 626 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 34 हजार 756 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 33 हजार 924 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 58 कोटी 25 लाख 49 हजार 595 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.