मुंबई,-१८ ते ४५ वय वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांना आता कोव्हीड लसीकरण मोफत करण्यात येणार असून महाराष्ट्र दिन १ मे पासून सुरवात करण्यात येणार असल्याचं ट्विट महाविकास आघाडीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून म्हटलं आहे की,महाविकास आघाडीने राज्यातील जनतेसाठी मोठा निर्णय घेतला आहे.आता १८ ते ४५ वय वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत लस राज्य सरकार देणार असून याचा प्रारंभ महाराष्ट्र दिनापासून अर्थात १ मे पासून करण्यात येणार आहे.
राज्यातील नागरिकांसाठी हा मोठा दिलासादायी निर्णय झाल्याचं बोललं जातं आहे.