मुंबई, (प्रतिनिधी)- निधी वाटपात असमानता असल्याने काँग्रेस आमदारांमध्ये प्रचंड रोष असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज माध्यम प्रतिनिधी सोबत बोलतांना सांगितले यामुळे पुन्हा आघाडी सरकार मध्ये धुसफूस असल्याचं समोर आलं आहे.
नाना पटोले पुढे म्हणाले की,वीज बिलाबाबत मंत्रिमंडळा सोबत चर्चा करुन ते माफ करण्यात यावे तसेच वाझे प्रकरणापासून ते मोहन डेलकर प्रकरणात राज्य शासनाने योग्य ती पावले उचलावी अशी मागणी केली जाईल असं ते यावेळी बोलत होते.