“ही जोडी कधीही तुटणार नाही याची काळजी घेऊया… असं वाचल्यावर आपल्या मनात नेमका प्रश्न पडला असेल कसली जोडी तुटणार नाही याबाबत काळजी घ्यायची आहे. तर मित्रहो ती जोडी अत्यंत महत्वाची असून ती जोडी म्हणजे ‘सीटबेल्ट आहे.’ महाराष्ट्र पोलीस विभागानं ट्विट करून भावनिक आवाहन केलं असून सीटबेल्ट लावा – निश्चिंतपणे प्रवास करा… अर्थात चारचाकी वाहणातून प्रवास करते समयी सीट आणि बेल्ट या जोडीला एकत्र आणत सिटबेल्ट लावा… ही जोडी कधीही तुटणार नाही याची काळजी घेऊया.
जर आपण चारचाकी चालत असाल तर सीट बेल्ट बांधा. या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे आपल्याला खूप महागात पडू शकते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार रस्ता अपघातात होणाऱ्या मृत्यूंपैकी 25 टक्के मृत्यू सीट बेल्ट बांधून टाळता येऊ शकतो. वाहन चालविण्याबरोबरच जे लोक मागच्या बाजूस बसतात त्यांच्यासाठी सीट बेल्ट देखील बांधले जावेत आणि हे सर्व आपल्या हिताचेच आहे.