मुंबई ,दि.५ – पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजपनं राज्यभर आंदोलन करत ठाकरे सरकारवर टीका करत निशाणा साधला असतांना शिवसेना नेता परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘भाजपचा पोपट पिंजऱ्यात गेला’ असल्याचा टोला लगावला आहे.
पत्रकारांशी बोलतांना अनिल परब म्हणाले की, अर्णब गोस्वामीच्या अटकेचा माध्यम स्वातंत्र्याशी काही काडीचाही संबंध नसून आत्महत्येप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. एका खुनी माणसाला वाचविण्यासाठी भाजपा गळा काढत आहे. सुसाईड नोटमध्ये अर्णब यांचं नाव आहे, नाईक कुटुंबीय कोर्टात गेले होते, त्यानंतर त्यांना तपासाची परवानगी दिली असून सर्व काही कायदेशीर आहे असंही अनिल परब यांनी दिली.