शहादा,(प्रतिनिधी) – माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेशामुळे पक्षाला उत्तर महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ‘बळ’ मिळणार असून राष्ट्रवादी पक्ष अधिक मजबूत होणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज शहादा दौऱ्यावर असतांना म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे नेते राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे आज नंदुरबार दौऱ्यावर आले असता नंदुरबार जिल्ह्याच्या आढावा बैठक घेतली. शहादा येथे त्यांची सभा झाली यावेळी बोलतांना पुढे ते म्हणाले की जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाची ताकत मोठी होती, मात्र अनेकांनी पक्ष सोडल्यामुळे पक्षाची ताकत कमी झाली होती मात्र आता पुन्हा पक्षाला ताकद मिळणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकणार असल्याचा दावाही त्यांनी केला.