पाचोरा महाविद्यालयात गुणगौरव व प्रकाशन सोहळा
पाचोरा ( प्रतिनिधी )- मोबाईल सह इतर इलेक्ट्रॉनिक साधने व सोशल मीडिया यांचा तरुण व विद्यार्थ्यांकडून गैरवापर वापर होत आहे. त्यातून सामाजिक व शारीरिक,मानसिक समस्या वाढत आहेत. जीवनाचे नियोजनच कोलमडले आहे. सोशल मीडियाचा सदुपयोग तरुण व विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन अभिनेत्री तथा छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख (अमरावती) यांनी पाचोरा येथे केले . पाचोरा तालुका शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ अध्यक्षस्थानी होते.
पीटीसी संस्थेच्या एम .एम. महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व अंकुर नियतकालिकाचे प्रकाशन कार्यक्रम शनिवार दि. २० रोजी संपन्न झाला .प्रा .डॉ .स्मिता देशमुख प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या .
सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रम सुरू झाला. याप्रसंगी पोलीस निरीक्षक अनिल शिंदे , प्राचार्य डॉ. रावसाहेब देशमुख, संस्थेचे मानद सचिव ॲड. महेश देशमुख ,व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी, संचालक सतीश चौधरी, डॉ जयंत पाटील ,योगेश पाटील, अर्जुनदास पंजाबी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ स्मिता देशमुख म्हणाल्या की ,विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे ‘ कोणतेही क्षेत्र कमी दर्जाचे नाही. जे क्षेत्र निवडाल त्यात शिखर गाठा तरुणांनी आपल्या मेंदूची शेती करावी म्हणजे वाईट विचार अनिष्ट प्रथा अंधश्रद्धा हे मनातील अनावश्यक तण उपटून फेकणे शक्य होते. जीवनात आव्हाने पेलून ते जागृततेने पार करून जीवनात आपले महत्त्व व वेगळेपण सिद्ध करा. असे आवाहन केले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक अनिल शिंदे , चेअरमन संजय वाघ यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले गुणवंत विद्यार्थ्यांच्या वतीने कल्पना परदेशी, समीना शेख, गरिमा पाटील, यांनी मते मांडली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयात सौर ऊर्जा प्रकल्प, पर्यावरण व्यवस्थापन व ग्रीन ऑडिट या प्रकल्पांसह आय. एस. ओ प्रमाणपत्राचे उद्घाटनही करण्यात आले.
अकरावी ते एम .ए. पर्यंतच्या विविध शाखांतील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले .अंकुर या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ .बी. एन. पाटील यांनी महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगती व गुणवत्तेचा चढता आलेख मांडला उपप्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले,प्रा.एस. एस. पाटील , प्रा .डॉ. शामराव पाटील ,प्रा मंगला शिंदे , प्रा. जंगम प्रा.जे.डी.गोपाळ ,प्रा शरद पाटील,प्रा.राजेश मांडोळे,प्रा.एस एस पाटील,प्रा.माणिक पाटील, उप प्राचार्य, समनव्यक, यांचेसह प्राध्यापक, विद्यार्थी ,पालक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.अतुल सुर्यवंशी, प्राध्यापिका सुनीता मांडोळे, प्रा.वैशाली बोरकर, यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गायनाने झाली .














