शेतकरी मित्रहो आपण बघतो, दिवसेंदिवस बदलत्या हवानाचा फटका शेतकर्यांना बसतो व त्याचा थेट परिणाम हा उत्पादन व उत्पन्नावर होत असतो,त्यातच शेतमालाचे बाजारभाव स्थिर किंवा निश्चित नसल्याकारणाने शेतमालाला योग्य दरही मिळत नाहीत. या सर्व बाबींवर मात करणे हे शेतकऱ्यांसमोर आव्हान ठरले आहे.म्हणून स्वतः हाडाचे शेतकरी असलेले व शेतकर्यांसंबंधीत अतिशय संवेदनशील असलेले कृषि विभागातील तालुका कृषि अधिकारी, पाचोरा , श्री रमेश जाधव, हे नेहमीच आपल्या स्वतःच्याच शेतीत नवनवीन प्रयोग करीत असतात, त्यातूनच स्वतःच्याच अनुभवातून त्यांनी आपल्या मौजे गोरनाळे ता जामनेर येथील शिवारातील प्रतिकून असलेल्या माळरानसारख्या शेतीत हवामान अनुकूल अशी शेती पद्धती साकारली, व त्या अनुभवातूनच अनुभव सिद्ध अशी माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांचा आकाशवानी जळगाव येथील किशोर पवार व सौ.किशोरी वाघुलदे यांनी खास शेतकऱ्यांसाठी ” शेतशिवार ” या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात रमेश जाधव ,तालुका कृषि अधिकारी, पाचोरा यांची ” हवामान आधारित नैसर्गिक शेती ” याविषयी माहितीचे प्रसारण दिनांक 28/2/2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता आहे, तरी सर्व शेतकऱ्यांनी हि माहिती जरूर ऐकूण आपल्या शेतीसाठी उपयोग करावा असे आवाहन करण्यात येतं आहे.















