जळगाव,(प्रतिनिधी)- आजपासून बारावीची परीक्षा सुरु होतं असून जिल्ह्यातील ७६ परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार आहे.परीक्षा केंद्राच्या ५० मिटर बाहेर परिसरात कलम १४४ नुसार जमावबंदी कायदा लागू करण्यात आला आहे, विदयार्थ्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवा कॉपी किंवा गडबड करायचा विचारही करू नका रेकॉर्डिंग होणार आहे.त्यामुळे काळजी घ्या…विदयार्थ्यांनो परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी हजर राहावे लागणार आहे.
परीक्षा सकाळी ११ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ या दोन सत्रांत होणार आहेत. परीक्षेच्या या निर्धारित वेळेनंतर अतिरिक्त १० मिनिटे विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात आलेली आहेत. पहिला पेपर इंग्रजीचा आहे.
जिल्ह्यात १७ कस्टडी आहेत. रनर या ठिकाणांहून प्रश्नपत्रिका व परीक्षा साहित्य ताब्यात घेऊन परीक्षा केंद्रातील येतील. केंद्र संचालकांच्या ताब्यात साहित्य देणे, प्रश्नपत्रिकांचे पाकीट उघडणे, साहित्याचे ब्लॉकनिहाय वर्गीकरण, परीक्षेची वेळ संपल्यावर उत्तरपत्रिकांचे संकलन, त्या कस्टडीत जमा करणे या प्रत्येक प्रसंगाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे.
जिल्ह्यात ४७ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट आहेत. कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, प्रत्येक हालचालींचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे. परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके नियुक्त असणार आहेत. त्यामुळे परीक्षेच्या वेळी गडबड करायचा विचारही करू नका, असा इशारा दिला आहे.
भरारी पथके नियुक्त
कॉपी रोखण्यासाठी शिक्षण व महसूल विभागाची भरारी पथके नियुक्त राहणार आहेत. ज्या परीक्षा केंद्रांवर जास्त कॉपीचे प्रकार घडतील, त्या परीक्षा केंद्राच्या केंद्र संचालकांवर कारवाई करण्यात येणार आहेत.