नवी दिल्ली : ICC T20 विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. BCCI ने अधिकृत वृत्त दिले नसले तरी PTI ने याबाबतचे वृत्त दिले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी सराव सत्रात जसप्रीतच्या पाठीला दुखापत झाली आणि त्याने या सामन्यातून माघार घेतली. ४-६ महिने त्याला क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे.
ऑस्ट्रेलियानंतर भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यास मैदानावर उतरला आहे. आशिया चषक २०२२ स्पर्धेला मुकल्यानंतर प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन केले. तीन सामन्यांपैकी दोनच सामने तो खेळला, परंतु काही खास कामगिरी झाली नाही. आता हाती आलेल्या बातमीनुसार त्याच्या पाठीची दुखापत गंभीर आहे, त्यावर शस्त्रक्रियेची गरज नाही, परंतु ४-६ महिने त्याला क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे.
हे पण वाचा :
411 रुपयाच्या गुंतवणुकीवर मिळेल 66 लाखाचा परतावा ; जाणून घ्या पोस्टाच्या या योजनेबाबत?
LPG साठी नवीन नियम, ग्राहकांना वर्षभरात फक्त 15 गॅस सिलिंडर मिळणार ; महिन्याचा कोटाही निश्चित
जळगाव जिल्ह्यातील ‘या’ आमदाराचे फेसबुक अकाऊंट हॅक
रेल्वेत नोकरी हवीये ना? आजच अर्ज करा, बारावी पास उमेदवारांना सुवर्णसंधी..
आशिया चषक २०२२ स्पर्धेत भारताला डेथ ओव्हरमध्ये हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे बुमराहच्या पुनरागमनामुळे भारताला बळ मिळाले होते. पण, आता रवींद्र जडेजानंतर भारतीय संघाला मोठा धक्का आहे.
भारतीय संघ- रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल,अर्शदीप सिंग; राखीव खेळाडू – मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर