जळगाव: राज्य पोलिस दलात कार्यरत असलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्यांचा आदेश गृहमंत्रालयाने बुधवारी प्रसिद्ध केला. मात्र 12 तासांच्या आतच यातील पाच अधिकाऱ्यांच्या बदलीला गृहमंत्रालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. यावरूनच भाजपचे नेते, माजी मंत्री गिरीश महाजन आक्रमक होत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
या महाविकास आघाडी सरकारचा गलथान कारभार पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करून आणि पुन्हा त्यांना स्थगिती देण्याच्या प्रकारातून समोर आला आहे, अशा शब्दात महाजन यांनी आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष असल्याने या पक्षांची तोंडे वेगवेगळी आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही सांगितले की त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोध करतो. राष्ट्रवादीने काही निर्णय घेतला की त्याला मुख्यमंत्री नकार देतात. त्यामुळे कशा पद्धतीने महाविकास आघाडी सरकारचा कारभार सुरू आहे हे कळत नाही, असे सांगत राज्यात असे दिवस यापूर्वी कधीच आले नव्हते, असाही टोला गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारचा लगावला.
हे पण वाचा :
भारनियमन कधीपर्यंत असेल? ऊर्जामंत्री राऊतांचे धक्कादायक वक्तव्य
Video : उर्फी जावेद बिकिनी परिधान करून पोहोचली हॉटेलमध्ये, नेटकरी संतापले
मोठी बातमी ! राज्य मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? गृहमंत्रीपदाची माळ यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता
या सरकारमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा, शेतकर्यांचा असा कुठलाही प्रश्न असो, त्याबाबत एकमताने निर्णय घेतला जात नाही. एकदा निर्णय घेतला कि तो पुन्हा बदलला जातो. असे एक नाही अनेक उदाहरणे आहेत, असेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.