जळगाव : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई संघटनेच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील पत्रकार बांधवांचा अपघात विमा काढून “पत्रकार बांधवांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एक पाऊल” टाकत आहे.
अपघात विमा पॉलिसी…
वैयक्तिक अपघात विमा काढणे आवश्यक का आहे ? अपघात कधीही, कुठेही होऊ शकतात. आपण दररोज वृत्ताकंन करतांना आपणास अनेकवेळा अपघाताच्या घटना मिळतात.अशी कोणतीही घटना घडण्यापूर्वी स्वतःचे संरक्षण करणे चांगले नाही का? म्हणूनच येथे अपघात विमा पॉलिसी मदत करते. अपघाती आपत्कालीन परिस्थितीत स्वत:चे आणि तुमच्या अवलंबितांचे रक्षण करण्यासाठी, वैयक्तिक अपघात संरक्षण मिळणे महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आपली काळजी म्हणून पत्रकार बांधवांचा अपघात विमा काढत आहे.
तुम्ही फक्त एवढंच करा…
1) पत्रकार व संघटनेचे सभासद असल्याबाबतचे ओळखपत्र
2) आधारकार्ड
3) पासपोर्ट साईज फोटो
4) नॉमिनीचे आधारकार्ड
हे चार कागदपत्र झेरॉक्स आपल्या संघटनेच्या तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, महानगर अध्यक्ष, विभाग प्रमुख, जिल्हाध्यक्ष, विभागीय अध्यक्ष /उपाध्यक्ष, विभागाचे संपर्क प्रमुख यांच्या पर्यंत पोहचवा….
अधिक माहितीसाठी – 9370653100














