जळगाव : भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली आहे. लायकी नसताना पक्षानं एकनाथ खडसेंना पदं दिली. ‘मी पक्षाला मोठे केले मात्र प्रत्यक्षात ते स्वतः साधे ग्रामपंचायतीत देखील निवडून येत नाहीत. आधी निवडून या आणि मग कुणी मोठं केल्याच्या बाता मारा, असं म्हणत खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, अशी जहरी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.
‘राज्यातील कोणतेही वीजनिर्मिती केंद्र कोळशाअभावी बंद नसल्याचे वीज मंडळाच्या तपशिलावरून स्पष्ट दिसत आहे. ढिसाळ कारभार व कमाल मागणीच्या वेळी पुरेशी वीजनिर्मिती करण्यात नियोजनाचा अभाव हेच राज्यातील वीज टंचाईला कारणीभूत आहे. खाजगी क्षेत्राकडून महागडी वीज खरेदी करून दलालीतील कमाई करताच हा वीज टंचाईचा घाट घातला जात आहे’, अशी टीकाही गिरीश महाजन यांनी केली. मार्चपासून जूनअखेरपर्यंत विजेची मागणी वाढते हे स्पष्ट असतानाही औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पांकरिता कोळशाचा पुरेसा साठा करण्याकडे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.असेही ते म्हणाले
दरम्यान, खडसेंवर टीका करताना महाजन म्हणाले की, ग्रामपंचायतमध्ये पडले. नगरपालिकेत आमचा महापौर आहे. मुलगी विधानसभेला उभी राहिली आणि पडली. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असेल तर ग्रामपंचायतीला पडतो का? असा खोचक सवाल महाजनांनी केलाय. खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यांचं भाषण मी ऐकलं, म्हणाले दोन चार मानणांना जेलमध्ये टाका. एखादा विक्षिप्त माणूसच असं करू शकतो, अशी टीकाही महाजनांनी केलीय.