रशिया-युक्रेन युद्ध दिवसेंदिवस तीव्र होतांना दिसत आहे. युक्रेनच्या राजधानी असलेल्या कीव शहराला तात्काळ सोडण्याचे आदेश भारत सरकारने दिले आहेत दरम्यान युद्धाला आठ दिवस उलटले असून हजारो भारतीय विद्यार्थी अद्यापही युक्रेनला अडकून आहेत. जळगाव जिल्ह्यातील १९ विद्यार्थी युक्रेनला असल्याची जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे.१९ पैकी ५ विद्यार्थी भारतात परतले असून ६ सीमेलगत आहेत तर ६ सुरक्षित आणि मार्गावर आहेत.तर दोन विद्यार्थ्यांचा मोबाईल बंद असल्याची माहिती मिळत आहे.
हे पाच विद्यार्थी परतले भारतात…
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार निकीत आमले, शोएब राशीद काकर, सुरज शिंदे, देवांग किशोर वाणी, बरीरा युसूफ पटेल हे विद्यार्थी भारतात परतले आहेत. यापैकी काही विद्यार्थी आपल्या स्वगृही देखील पोहचले आहेत.
सौरभ विजय पाटील, ओम मनोज कोल्हे, मुस्कान रामशंकर जैस्वाल, श्रद्धा आनंद धोनी, लोकेश विजय निंभोरे, क्षितिजा गजानन सोनवणे हे विद्यार्थी पोलंड सीमेलगत आणि हंगेरीजवळ आहेत. तसेच विजय दिलीप परदेशी, प्रसन्ना संजीव निकम, कल्याणी छगनराव पाटील, रोहन सुनील चव्हाण, यश राजेंद्र परदेशी, शिमा फतेमा शेख अन्सार हे विद्यार्थी सुरक्षित आहे. यश हा होस्टेलच्या भूमिगत बंकरमध्ये आहे.
या विद्यार्थ्यांचा मोबाईल येतोय बंद
जिल्ह्यातील निलेश योगराज पाटील, सुमित सुरेशचंद्र वैश्य या दोन विद्यार्थ्यांचे मोबाईल बंद आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप घरी आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.