तुम्ही ‘चहा’ पीत असलाचं, तर ही बातमी तुम्ही एकदा वाचलीचं पाहिजे. चहा पेय काही लोक खूप आवडीने पीत असतात, अनेक ठिकाणी तर आता चहाचे मोठे अमृततुल्य नावानं शॉप सुरु झाल्याचे आपण अलीकडच्या काळात पाहिले आहे. यावरून आपल्या लक्षात येईल की चहा पेय किती लोकप्रिय होतं चाललं आहेत. आलेल्या पाहुण्यांचा आदरतिथ्य देखील चहापासून सुरु होतो त्यामुळे आता चहाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नही. त्यामुळे चहा पिण्याचे फायदे, नुकसान आणि समज गैरसमज तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे.चला तर चहा बद्दल जाणून घेऊया काही महत्वपूर्ण माहिती….
अनेक जण असं म्हणतात की अधिक चहा प्यायला तर त्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या शरीरावर होतो,माणसाची त्वचा काळवंडते आणि त्याचा रंग बदलतो. या समजामुळे इच्छा आणि आवड असूनही अनेकजण चहा पिणं टाळतात. मात्र खरोखर असं होतं का ? चहा प्यायल्याने त्वचेचा रंग बदलतो का ?
खरं तर माणसाच्या शरीराच्या त्वचेचा रंग हा मेलॅनिनच्या अनुवांशिकतेवर अवलंबून असतो. मेलॅनिनच्या कमी अधिक प्रमाणामुळे त्वचेचा गोरा, गव्हाळ किंवा कृष्णवर्णीय रंग होत असतो.मात्र अनेकांना हा गैरसमज असल्याने चहा आवडत असून सुद्धा लोक चहा पिणे टाळतात.
चहाचे अति प्रमाणात सेवन केल्याने मेलॅनिनवर काही परिणाम होतो का, याबाबत संशोधकांनी प्रयत्न केला होता. संशोधनानुसार, चहा प्यायल्याने आपला रंग अजिबात काळवंडत नाही, परंतु याउलट जर योग्य प्रमाणात चहाचे सेवन केले तर तो आपल्या शरीरातील अनावश्यक द्रव्ये बाहेर पडण्यास मदत करते आणि त्याचा त्वचेच्या आरोग्यावरही चांगला परिणाम होतो.
चहा बद्दल काही गैरसमज…
चहामध्ये कॅफिन असते ज्यामुळे लहान मुलांच्या मेंदूवर परिणाम होतो असं म्हटलं जातं. चहा प्यायल्याने लहान मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून असे गैरसमज पसरवले जातात असं संशोधकांचं म्हणणं आहे.
चहा पिण्याचे काही फायदे….
चहामध्ये अँटीऑक्सिडंट्सचा समावेश असतो. अँटिऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील मुक्त पेशींवरील प्रभाव कमी करतात. चहासह अँटिऑक्सिडंटने समृद्ध असलेले पदार्थ खाल्ल्याने त्याचा शरीराला फायदा होतो. तसेच हृदयविकार, कर्करोग आणि वृद्धत्वाच्या समस्यांचा धोका चहामुळे बर्याच प्रमाणात कमी होतो.
चहा प्यायल्याने होणारे नुकसानही जाणून घ्या…
चहा प्यायचे जेवढे फायदे आहेत तेवढेच नुकसान देखील आहेत. रिकाम्या पोटी चहा प्यायचा नाही,कारण रिकाम्या पोटी जर आपण चहाचे सेवन केले तर पित्त उमळते यामुळे पित्ताचा पचन क्रियेवरही परिणाम होत असतो. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पोटात जळजळीचे आणि अल्सरचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.