जळगाव : महाराष्ट्र सरकारच्या माझी वसुंधऱा योजने अंतर्गत दिवाळीत होणारे प्रदूषण रोखण्याच्या उद्देशाने विभागीय आयुक्तांनी फटाके विक्रीवर बंदीचा निर्णय घेतला होता. मात्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदा जळगावकरांची दिवाळी दणक्यात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नाशिक विभागात फटाक्यांवर बंदी घालण्याच्या संदर्भात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी निर्देश दिले होते. नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार आणि जळगांव जिल्ह्यात हा निर्णय लागू होणार होता. या सर्व 5 जिल्ह्यात फटाके स्टॉल्सचे लिलाव पालिकांनी काढले होते त्यानंतर विभागीय आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयामुळे हे लिलाव अडचणीत आले होते. वायू आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.
फटाके बंदीच्या या निर्णयामुळे फटाके विक्री करणारे तसेच नागरिकांमध्ये काहीशी नाराजी होती. मंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे आधिच व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. गेल्यावर्षीही फटाक्यांवर बंदी असल्याने वापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी फटाके बंदीच्या संदर्भात पत्रक काढल्याने व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता उद्भवली होती. फटाके विक्री करुन उदर्निवाह करणाऱ्यांसमोरही मोठे संकट उभं रिहलं होतं. पण आता फटाके बंदीचा प्रस्ताव फेटाळल्याने या व्यापाऱ्यांन मोठा दिलासा मिळाली आहे.














