जळगाव : जिल्ह्यात दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. काल शनिवारी सायंकाळी जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे आज रविवारी धरणाचे ८ दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणातून १३३७७ क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तरी कोणीही नदीपात्रा जवळ जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात मागील महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर वाढला आहे. गेले अनेक दिवस जिल्ह्यात पावसाची सततधार सुरू होती. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरण ओवरफ्लो झाले. परंतु या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असता आज पहाट पासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. वाघुर धरण क्षेत्रात संततधार पावसाने जलाशयाच्या पाणी पातळी मध्ये वाढ होत आहे. सद्यस्थितीत वाघूर धरणाचे ८ द्वारे उघडण्यात आली आहे व त्या द्वारे १३३७७ कयुसेक विसर्ग सोडण्यात आलेला आहे तरी कोणीही नदीपात्रा जवळ जाऊ नये असे आवाहन करण्यात आले.