जळगाव प्रतिनिधी | लाेकप्रतिनिधीच्या प्रमाणपत्रासंदर्भात प्रश्न उपस्थित हाेत असतील तर ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ हाेणे गरजेचे अाहे. त्यामुळे लाेकामंध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता अधिक अाहे. अशा परिस्थितीत अपंगत्वाच्या प्रमाणपत्राची उच्चस्तरीय चाैकशी व्हायला हवी, अशी मागणी मुक्ताईनगरचे अामदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.
जळगाव येथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत अजिंठा विश्रामगृहात अायाेजित कार्यक्रमानंतर अामदार पाटील यांना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या प्रमाणपत्राविषयी विचारले. सर्वसामान्य माणसाला अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी दुपारपर्यंत बसून रहावे लागतात. अनेक अटींची पूर्तता करावी लागते; परंतु जेव्हा लाेकप्रतिनिधींच्या संदर्भात असे विषय पुढे येतात तेव्हा सर्वसामान्यांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता अाहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चाैकशी करून घेणे गरजेचे अाहे. एकनाथ खडसे देखील ही अग्निपरीक्षा देतील, असा विश्वास अामदार पाटील यांनी व्यक्त केला.