जळगाव, (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील लग्न समारंभ, अंत्यविधी व इतर मोठया कार्यक्रमांसाठी आता 50 पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहता येणार नाही असे निर्देश आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे.
जिल्हयातील कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन आज जिल्हाधिकारी यांनी कोरोना परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी यापुढील लग्न समारंभ, अंत्यविधी व इतर मोठ्या प्रमाणात गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांना एकावेळी 50 पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.50 पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास त्याबाबतची जबाबदारी निश्चित करुन नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
परवानगी घ्यावी लागणार
लग्न समारंभासाठी स्थानिक पोलीस स्टेशन व स्थानिक स्वराज्य संस्था यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील. तर जास्त गर्दीच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात येणार आहे.















