जळगाव, (प्रतिनिधी)- विधानपरिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यातील आपली ताकद वाढवण्यासाठी ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा‘ सुरू केली आहे.
‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा’ च्या नियोजना बाबत आज मुक्ताईनगर राष्ट्रवादी कार्यालयात माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैया पाटील, कल्पनाताई पाटील, जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणीताई खडसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व प्रमुख नेते संपूर्ण महाराष्ट्र दौरे करत आहेत. या यात्रेतून कार्यकर्त्यां सोबत पदाधीकारी यांच्याशी संवाद साधण्यात येत असून इतर पक्षातील नेत्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला जात आहे. पक्षबांधणीसाठी राष्ट्रवादी मैदानात उतरल्याचे दिसत आहे.














