चाळीसगाव – ग्रामीण भागात अनेक आरोग्याच्या समस्या आहेत रुग्णाला अचानक काही त्रास झाला तर त्यांना शहराकडे जावे लागते. परिस्थिती गरिबीची असेल तर वेळेवर वाहन उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेकदा रुग्ण आजार अंगावर काढतात आणि त्याचे रुपांतर मोठ्या आजारात होऊन नाहक मोठा भुर्दंड नातेवाईक यांना बसतो रयत सेनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्यासाठी जनजागृती करून आरोग्य शिबीर घेतले जातील त्यामाध्यमातून रुग्ण सेवा करण्याचा आमचा मानस असल्याचे प्रतिपादन रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ पवार यांनी काकळणे या गावात दि २० रोजी रयत सेना शाखा फलकाचे अनावरण प्रसंगी केले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले ,तदनंतर काकळणे रयत सेना शाखा फलकाचे अनावरण रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ पवार यांच्या हस्ते करण्यात आले.रयत सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष संतोष निकुंभ ( संता पहेलवान ) यांनी शाखा अनावरण प्रसंगी बोलताना सांगितले की रयत सेना ही संघटना राजकारण करत नाही.किंवा त्यात भाग घेत नाही तर ग्रामीण भागात असलेल्या रस्ते,पाणी, विजेचे प्रश्न,विद्यार्थ्यांच्या समस्याना शासन प्रशासन स्तरावर प्रयत्न करून मार्गी लावून न्याय देण्याचे काम करणारी संघटना आहे. संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप ,आरोग्य शिबिरात अनेक रुग्नाना आर्थिक मदत , गोरगरिबांना दिवाळीचे फराळ वाटप , सर्वसामान्य नागरिकांना ब्लॅकेड व कपडे स्व खर्चाने वाटप,कोरोना काळात गरीबांना किराणा साहित्य ,यासह विद्यार्थी,कामगार,महिला,बेरोजगार तरुणांना सढळ हाताने आर्थिक मदतीसह अनेक उपक्रम आज पर्यंत संघटनेच्या माध्यमातून राबविले आहेत. ग्रामीण भागात अनेक प्रश्न आज पर्यंत भेडसावत असून ते सोडवण्यासाठी रयत सेना लढा उभारून समस्या तडीस नेवून तळागाळातील नागरिकांना न्याय देण्याचे काम करणार असल्याचे सांगत रयत सेनेचे कार्य शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करणार असल्याचे सांगितले, गणेशभाऊ पवार पुढे बोलताना म्हणाले की
ग्रामीण भागात आरोग्याच्या समस्या या सुटल्या पाहिजेत म्हणून आरोग्य शिबिराच्या माध्यमातून रयत सेनेच्या वतीने ग्रामीण भागात रुग्ण सेवा करण्याचा आमचा मानस असल्याचे प्रतिपादन रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ पवार यांनी काकळणे येथे दि २० रोजी रयत सेना शाखा फलकाचे अनावरण प्रसंगी केले. काकळणे रयत सेना शाखेच्या अध्यक्षपदी जीवन बागूल,उपाध्यक्ष गोरख गायकवाड ,कार्याध्यक्ष आकाश पाटील, संघटक भूषण पाटील,सचिव गौरव पाटील, सहसचिव आकाश पाटील, कोषाध्यक्ष भिकन पाटील ,प्रसिद्धी प्रमुख उमेश पाटील ,समन्वयक ऋषिकेश पाटील,उपसचिव रवींद्र भिल्ल,सहसंघटक विजय जाधव,मार्गदर्शक अमोल पवार यांची निवड रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी जाहीर केली.कार्यक्रमास ह्युमन राईट्स अध्यक्ष सुमित भोसले,रयत सेना प्रदेश संघटक ज्ञानेश्वर कोल्हे,सचिव प्रमोद वाघ, यांच्यासह जयेश पाटील,सतीश निकुंभ, चेतन निकुंभ,गोकुळ पावले,बाळासाहेब निकम,विशाल निरभवणे ,हिंमत पाटील, भीमराव पाटील, राजेश पाटील, कल्याण पाटील, आकाश पाटील, भिकन पाटील, जीवन पाटील, गोरख गायकवाड, भूषण पाटील,तमगव्हाण शाखेचे अध्यक्ष तुषार पाटील,संघटक शुभम पाटील,राकेश पाटील, प्रशांत पाटील ,सागर पाटील, नचिकेत पाटील ,सौरभ पाटील, ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासह काकळणे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.