वरणगावं,(अंकुश गायकवाड):-वरणगाव येथील बसस्थानक चौकात केंद्र सरकारच्या महागाई वाढी विरोधात भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे निदर्शने करण्यात आले.
देशात महागाईचा भडका झाला आहे पेट्रोल-डिझेलची दरवाढ दैनंदिन होत आहे पेट्रोल शंभरीकडे तर डिझेल नव्वदी कडे वाटचाल करीत आहे असे असताना केंद्र सरकार महागाई रोखण्यात अपयशी ठरत असून त्याचा बोजा सर्वसामान्यांना पडत आहे तरी सरकारने महागाई त्वरित कमी करावी व सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली तसेच या जगाचा पोशिंदा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेतीप्रधान देशाचा मुख्य घटक शेतकरी राजा शेतकऱ्यावर लादण्यात आलेला अन्यायकारक कायदा मागे घ्यावा यासाठी आंदोलन करत आहे व आपल्या न्याय मागण्या सरकारपर्यंत पोचवत आहे हे करत असताना रावसाहेब दानवे यांसारखे केंद्रीय मंत्री जे नेहमी वादग्रस्त विधाने करून प्रकाशझोतात राहण्याचा प्रयत्न करीत असतात अशा केंद्रीय मंत्र्यांचा निषेध करण्यात येऊन केंद्र सरकारने त्यांची मंत्रिपदा वरून हाकलपट्टी करून शेतकऱ्यांचा अवमान केला व शेतकऱ्यांवर चुकीचे घाणेरडे आरोप केले म्हणून कारवाई करावी अशी एकमुखी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आणि रावसाहेब दानवे यांचा निषेध करण्यात आला या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन,उपजिल्हा संघटक विलास मुळे, माजी जिल्हा परिषद सदस्य एडवोकेट श्री मनोहरजी खैरनार, अल्पसंख्यांक उपजिल्हा संघटक सईद मुल्लाजी, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे,माजीशहर प्रमुख संजय वंजारी, अल्पसंख्यांक तालुका संघटक अब्रार खान, उपशहर प्रमुख प्रशांत पाटील,विभाग प्रमुख भूषण बाविस्कर,पंकज पाटील, सुरेश चौधरी, नीळकंठ सरोदे,नितीन देशमुख, आबा पाटील, सद्दाम मुल्ला जी, राज शेठ, प्रकाश कोळी,राहुल वंजारी, सागर वंजारी,अतुल पाटील, आबा सोनार, निलेश सुरडकर, निलेश ठाकूर, भूरा धरणे,चिंटू सोनवणे, साईचरण चौधरी,कैलास पाटील,कृष्णा पाटील नेहेते, भूषण राणे,निखिल चौधरी, बाळा गुजर, सागर लोंढे, सागर वाघ, सम्राट मराठे, दीपक पाटील, नितीन पाटील,धनराज निळे, सदाशिव निळे यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.