वरणगावं,(अंकुश गायकवाड):- नवी दिल्ली येथील ऐतिहासिक जंतरमंतर मैदानावर 03.11.2020 रोजी कैकाडी समाज संघर्ष समिती महाराष्ट्र संस्थापक नेतृत्व एस. एल. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली कैकाडी समाजावरील क्षेत्रीय बंधन उठविण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
ऐतिहासिक जंतरमंतर मैदानावर कैकाडी समाजाच्या आंदोलना बरोबरच इतरही आंदोलने होती, अत्यंत स्वाभिमानी व लढाऊ वृत्ती असणाऱ्या कैकाडी समाजाचे आंदोलन अत्यंत देखणे आकर्षक व परिणामकारक ठरले सदर आंदोलनाला खासदार राकेश सिंह
राज्यमंत्री विजय कुमार,देशाचे ज्येष्ठ नेते रा.सू.गवई यांचे नातू डॉक्टर भूषण गवई, राज्यसभेचे महाराष्ट्रातील सदस्य खासदार डॉक्टर विकास महात्मे तसेच राष्ट्रीय मानव अधिकार समिती, पैगाम संघटना आधी विविध संघटनेने या धरणे आंदोलनाला भेट दिली व पाठिंबा दिला.
सदर आंदोलनात ऐतिहासिक जंतरमंतर मैदानावरील सर्व मीडिया पत्रकार बांधव, इलेक्ट्रॉनिक मीडिया टीव्ही चॅनल या सर्वांनी कैकाडी समाजाच्या आंदोलनाची धार व तीव्रता पाहून संपूर्ण वेळ संघर्ष समिती आयोजित धरणे आंदोलनाला दिला.
पंजाब हरियाणा येथील शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन असतानाही मिडीयाने आंदोलनकर्त्यांना स्पष्ट सांगितले, कैकाडी समाजाचे आंदोलन संपल्यानंतरच पंजाब हरियाणा च्या शेतकरी आंदोलनाला कव्हरेज दिले जाईल.
दिल्ली येथील इलेक्ट्रॉनिक मीडियानेही कबूल केले की “आज होत असलेले आणि चालू असलेले कैकाडी समाजाचे आंदोलन अत्यंत परिणामकारक ठरत आहे “सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे राज्यसभेचे कामकाज चालू असताना आंदोलनाचा जोर आणि वेग प्रचंड होता.
प्रशासनाने प्रचंड सहकार्य केले. सदर आंदोलनासाठी कोरोनाच्य पार्श्वभूमीवर अत्यंत कमी लोकांना परवानगी असूनही जंतर मंतर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बहादूर सिंग यांच्या सहकार्याने आम्ही किमान दोनशे लोकांना आंदोलनस्थळी घेऊन जाण्यास यशस्वी ठरलो.
आसपास असणारे अनेक सरकारी कार्यालयांनी आम्हाला कामाची पावती दिली की गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून सुनेसुने असलेले जंतर-मंतर आंदोलन आज खऱ्या अर्थाने कैकाडी समाजाने गाजविले.
सदर आंदोलनात कैकाडी समाजाच्या महिला सर्वात पुढे होते मीडियाशी बोलल्या भाषण केले घोषणाबाजी केली आणि कैकाडी समाजाची महिला जर संधी मिळाली तर काय करू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचे जंतर-मंतर चे आंदोलन.
सदर आंदोलनात कैकाडी समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री एस. एल. गायकवाड, कार्याध्यक्ष नारायणराव गायकवाड, बापू नांदुरकर, अंबादास जाधव, कैकाडी समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक संजू बाबा गायकवाड(नेवासा), सौ.कोयना ताई, सौ. लक्ष्मीबाई जाधव ,सुवर्णाताई जाधव, कैकाडी समाज भूषण श्रीमती सुलोचना ताई माने,रामेश्वर माने(अकोला),एडवोकेट शुभम प्रकाश, दिल्ली येथील कैकाडी समाजाचे बिबीशन जाधव
अंजनी येरकुल्ला,कृष्णा येरकुळला , सोमा भाऊ, गणेश ठाकूर, श्रीमती अशा चंद्रा,सुप्रीम कोर्टाचे वकील राजेश शहा, चंपतराय ,कांबळे, साखरे,आधी समाजातील व समाजा बाहेरील विविध मान्यवर हजार होते
सर्वात विशेष म्हणजे कैकाडी समाज हा जंतरमंतर मैदानावरील एकमेव समाज असा ठरला की ज्या समाजाने सर्वप्रथम माननीय पोलीस उपायुक्त संसद मार्ग नवी दिल्ली पोलीस उपनिरीक्षक जंतर-मंतर मैदान बहादूर सिंग यांचे आंदोलनाच्या सुरुवातीलाच आभार मानले व पोलिसांनी पण कबूल केले की आमचे आभार पहिल्यांदा मानले गेले.
सामाजिक न्याय मंत्री नामदार थावरचंद गेहलोत राज्यसभा सदस्य, प्राध्यापक राकेश सिन्हा राज्यसभा सदस्य,डॉक्टर विकास महात्मे , जंतर-मंतर मैदान येथील सर्व इन्चार्ज , इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, इंडिया प्रेस क्लबच्या कार्यकारणी सदस्य श्रीमती गीता मॅडम, सदर धरणे आंदोलनासाठी ज्यांनी मंडपाची व्यवस्था केली, ती सर्व मंडळी प्रशासनाने पाण्याची व चहाची व्यवस्था केली, ते सर्व प्रशासन, आणि महाराष्ट्रातून ज्या सर्व कैकाडी समाज बांधवांनी सदर आंदोलनाला पाठिंबा दिला ते सर्व समाज बांधव, इच्छा असूनही घरगुती कारणास्तव काही समाजबांधव सदर आंदोलनाला उपस्थित राहू शकले नाही,असे सर्व समाज बांधव समाजातील सर्व घटक ,नेते मंडळी ,कार्यकर्ते या सर्वांचे संघर्ष समितीचे अध्यक्ष एस. एल. गायकवाड व कैकाडी समाजाचे जेष्ठ नेते संजू गायकवाड यांनी आभार मानले.