जळगाव,दि.५ – पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजपनं ठाकरे सरकारवर टीका करत निशाणा साधला आहे. त्यातच माजी मंत्री भाजपचे नेते आ.गिरीश महाजन यांनी देखील अर्णबच्या अटकेनंतर ठाकरे सरकारवर आपल्या ट्विटर हॅण्डलवरून निशाणा साधला आहे.
गिरीश महाजन यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे की, महाराष्ट्रात महाविकासाघाडीकडून ‘अघोषित आणीबाणी’द्वारे लोकशाहीची हत्या!
लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारीता क्षेत्रावर हा मोठा आघात आहे.
विरोधात भुमिका मांडली म्हणून अर्णब गोस्वामींविरूद्ध महाविकासआघाडी सरकारतर्फे सूडबुद्धीने केलेल्या कार्यवाहीचा जाहीर निषेध!
लोकशाहीच्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळा काढणारे सर्व ढोंगी पुरोगामी, सेक्युलर व तथाकथित निष्पक्ष पत्रकार या लोकशाहीच्या हत्येविरुद्ध, पत्रकारितेच्या गळचेपीविरुद्ध मौन का आहेत ?असं ट्विट करुन जाब विचारला आहे.