चाळीसगाव – चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव पंचक्रोशी मध्ये जलयुक्त शिवार योजनेला मोठं यश आले आहे. . 5 गावांच्या परिसरात विहिरींची पाणी पातळी तब्बल 50 फुटांनी वाढली आहे.
खेडगाव , खेडी , पोहरे , डस्केबर्डी , कलमडू या पंचक्रोशी मध्ये पावसाने दमदार हजेरी लावलीय. गेल्या तीन वर्षात प्रफुल्ल साळुंखे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चाळीसगाव विकास मंच माध्यमातून पंचक्रोशी मध्ये जलयुक्त शिवार योजना प्रत्यक्षात आणली. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच मार्गदर्शन आणि जलसम्पदा मंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्याने पंचक्रोशीमधील नारळी नदी आणि उतावली अशा दोन नद्यांचे प्रत्येकी चार किलोमीटर खोलीकरण केलं. त्याच बरोबर दोन्हीं नद्यांवर साखळी पद्धतीने 11 बंधारे बांधले, या भागातले 27 नाल्यांच खोलीकरण केलं. हे सर्व नदी नाले आणि बंधाऱ्यात पाणी साठवण झालीय. सुमारे 32 कोटी लिटर चा पाणीसाठा झाला आहे. या पावसानं विहिरीच्या पाणी पातळीत 50 फुटांनी वाढली आहे. या पावसाने सुमारे चार हजार हेक्टर वर पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.