जळगाव, (प्रतिनिधी) – महानगर पालिका स्थायी समितीने येत्या 22 रोजी विविध विषयांना घेऊन सभा बोलावल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाले या सभेबाबत प्रश्न उपस्थित करून सदर सभा कुठल्याही ठोस किंवा महत्वाच्या विषयी नसल्याने राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील कुणाल पवार व शिवसेनेचे शरद तायडे व मनपाचे विरोधी पक्ष नेता सुनील महाजन यांनी थेट मनपा आयुक्त यांना सभा रद्द करण्याकामी आज निवेदन दिले आहे.
जळगाव शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत असतांना महानगरपालिकेच्या स्थायी सभापती यांनी दि. 22 मे रोजी मनपा स्थायी समितीची सभा बोलवली आहे. या सभेत सभेत फंडाची युनियन बँकेत गुंतवलेली रक्कम सदर खाते बंद करून मिळणार परिपक्वता रक्कम व्याजासह बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीय कृत बँकेत गुंतवणूक करणे कामी प्रशासनाकडून आलेल्या प्रस्तावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच उमाळा पाणी शुद्धीकरण केंद्र या ठिकाणी पाणी शुद्ध व निरजंतुकीकरण करण्यासाठी लागणारे पिवळी तुरटी पुरवठा करणे साठी पुरवठादार विक्रम केमिकल नाशिक यांचे कमीचे रक्कम 12 हजार 800 प्रति मे. टन नुसार आलेले दरात मान्यता देणे यासह आठ विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.
शासनाने यापूर्वीच परिपत्रक काढून परिस्थिती पाहून महानगरपालिकेने सभा घ्यावी असे आदेश दिले आहेत. जळगाव शहरात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असताना स्थायी सभापती यांनी 22 रोजी स्थायी समितीची सभा बोलवली आहे या सभेस शिवसेनेचे विरोधी पक्ष नेता नगरसेवक सुनील महाजन यांनी विरोध केला असूनआयुक्तांकडे ही सभा रद्द करण्याची मागणी केली आहे. आणि तरीही सभा झालीच तर सभेला हजर असणार्यांवर कलम 144 उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे अशी तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या कडे करणार असल्याची माहिती नगरसेवक सुनिल महाजन यांनी दिली.
राष्ट्रवादी आपल्या स्टाईल ने विरोध दर्शविणार – अभिषेक पाटील
कोरोना संसर्ग परिस्थिती असून देखील स्थायी समितीची सभा रद्द न झाल्यास राष्ट्रवादी आपल्या स्टाईल ने विरोध दर्शविणार असल्याचे मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहेत.
गेल्या तीन महिन्यांपासून स्थायी समिती सभापती यामहापालिककेत आलेल्या नाही. तसेच शहरातील एकही भागाची पाहणी त्यांनी या तीन महिन्यात केली नाही. परंतु 22 रोजी त्यांनी स्थायी समितीची सभा आयोजित केली आहे. या सभे संदर्भात शहराचे आमदार राजूमामा भोळे यांना देखील कल्पना देण्यात आलेली नाही कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असताना मनपा तर्फे नागरिकांना घरात रहा असा संदेश देण्यात येत असताना चक्क स्थायी समितीची सभा घेण्याचा निर्णय सभापतींना कसा घेतला असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही सभा फक्त आर्थिक देवाण घेवाण होण्यासाठी होत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेता नगरसेवक सुनील महाजन यांनी “दैनिक नजरकैद”शी बोलताना केला.
जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत असून जळगाव जिल्हा हा “रेड झोन” म्हणून प्रशासनाने जाहीर केला आहे. तसेच प्रत्येक नागरिकांनी घरातच राहुन कोरोनाला आळा घालावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने तर्फे करण्यात आले असून जिल्हाधिकारी यांनी 144 कलम लागू करून जमाव बंदीचे उल्लंघन करणार्या वर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तरी देखील कोरोना संसर्गाच्या भयानक परिस्थितीतही स्थायी समितीने आयोजित केलेल्या बैठकीवर प्रश्न उपस्थित होत आहे.















