लातूर – एकाच दिवशी शेतकरी पती – पत्नीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना लातूर तालुक्यामधील गादवड येथे घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे, गावाच्या शिवारामध्ये लिंबाच्या झाडाला दोघांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने हळहळ व्यक्त होत आहे.याप्रकरणी शनिवार दिनांक १३ रोजी मुरुड पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शेतकरी बळीराम रावसाहेब कदम (वय-५०) आणि वैशाली ऊर्फ मंगलबाई बळीराम कदम असे आत्महत्या केलेल्या शेतकरी पती – पत्नीचे नाव आहेत. ते लातूर तालुक्यातील गादवड गावामधील रहिवासी आहे. शेतकरी पती पत्नीने शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास शेतातील लिंबाच्या झाडाला सुताच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.