जसे योगा या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे, तशी प्राणाची ही आहे. प्राण म्हणजे श्वास, जीवन, वायू, ऊर्जा, ताकद, आत्मा.आयाम म्हणजे लांबी पसरणे व्यक्ती वाढविणे तसेच प्राणायाम म्हणजे प्राणाची विश्वासाची ऊर्जेची व्याप्ती वाढविणे होय. श्वासावर ताबा मिळविणे म्हणजे प्राणायाम होय.
प्राणायामात प्रामुख्याने पुढील स्थिती येतात.
• पूरक श्वास आत घेणे
• रेचक श्वास बाहेर टाकणे.
• कुंभक अशी स्थिती ज्यावेळेस श्वास घेणे किंवा टाकणे ही क्रिया होत नाही.
• कुंभक दे आंतर कुंभक आणि बाह्य कुंभक असे दोन प्रकार होतात.
ज्यांना वाढीव ब्लडप्रेशरचा त्रास आहे त्यांनी आंतर कुंभक करणे टाळावे आंतर कुंभक म्हणजे श्वासा आत घेतल्यानंतर तो काही काळा आतच ठेवणे म्हणजे बाहेर न टाकणे. अशा स्थिती मध्ये शरीराच्या आतील भागामध्ये, उदरात किंवा छातीत हवेचा दाब वाढतो. हा दाब हृदयावर देखील वाढतो आणि वाढीव बीपी च्या पेशंटला त्रास होऊ शकतो.
प्राणायाम जसे आपल्यासाठी खूप उपयोगाचे आहे तसेच चुकीचे प्राणायाम घातकही होऊ शकते. त्यामुळे जोपर्यंत श्वास घेणे आणि सोडणे याची लयबद्धता आपण साधत नाही तोपर्यंत कुम्भक करणे टाळावे.
श्वसनाचा सामान्य वेग हा मिनिटाला १६ ते १८ एवढा असतो. योगी चे आयुष्य त्याच्या दिवसांनी नव्हे तर श्वासांनी मोजले जाते असे म्हणतात.
श्वासोच्छ्वासाची खरी पद्धत हळू आणि खोल श्वास करणे अशी असते. जेवढा श्वासाचा वेग कमी आणि नियंत्रित तेवढे फुफ्फुसांचे आरोग्य चांगले. जेवढा श्वासाचा वेग जास्त तेवढे फुफ्फुसे कमजोर. प्राणायाम या श्वासातील लयबद्धता वाढवते. ज्यामुळे श्वसन मार्ग सक्षम बनते, हृदय सक्षम बनते व मज्जासंस्था ही सक्षम बनते. ही सक्षमता आपल्या मनातले हव्यास अनावश्यक इच्छा आपोआपच कमी होतात आणि मनाचेही आरोग्य साधले जाते.
ज्याप्रमाणे राखीच्या खाली निखारे दबले जातात व सभोवताली अंधार होतो आणि राख उडून गेल्यावर ते निखारे प्रकार होतात आणि आजूबाजूचा परिसर प्रकाशमान होतो. त्याच प्रमाणे प्राणायामाने आपल्या आतील िखार्यांवरील राख झटकली जाते आणि आपला आंतरिक प्रकाशाला पसरायला जागा मिळते.
मनातील सर्व भाव-भावना राग-लोभ काढणे म्हणजे मन पूर्णतः रिते करणे म्हणजेच रेचक आणि अहंपणा जाउन आत्म्याची अनुभूती होणे म्हणजेच कुंभक होय. ही प्राणायाम ची खरी अवस्था होय आणि ती नित्य यत्न करूनच मिळते.
निसर्गातला प्रत्येक सजीव प्राणी श्वास घेतो त्यावेळेस सो असा नाद होतो आणि ज्या वेळेस श्वास बाहेर टाकतो अहम असा नाद होतो. त्यांचा एकत्रित उच्चार सोहम असा होतो म्हणजे प्रत्येक सजीवाच्या श्वासामध्ये सोहम चे वास्तव्य आहे असे म्हणतात.
सो म्हणजे ब्रम्हांड ‘हम’ म्हणजे ‘मी’ . मी आणि ब्रह्म जोपर्यंत एकत्र आहे तोपर्यंत माझे अस्तित्व आहे म्हणजे हा श्वास माझ्यात आहे.
सोहम प्रत्यक्ष सजीवाने नकळत जपलेला मंत्र आहे म्हणून याला ‘अजप मंत्र’ असे म्हणतात.
आचरण पाचवे:– झोपण्यापूर्वी बिछान्यावर बसल्यावर कमीत कमी पाच मिनिटे वज्रासनात बसावे किंवा दिवसभरातून कधीही वेळ मिळेल तर पाच मिनिटे वज्रासनात बसावे. पण जास्त वेळ शक्य आहे त्यांनी जास्त वेळ बसावे.
विश्लेषण:– पूर्वी बैठक पद्धत होती त्यामुळे पोट भरायचे आणि गुडघ्यांचा व्यायाम व्हायचा. आता दिवसभर आपण खुर्चीवर पाय लटकून बसतो म्हणून गुडघेदुखी आणि हृदयाचे आजार वाढले. हो ह्रदयाचेच म्हटले मी. आपल्या पोटऱ्यांना व्हेनस हार्ट म्हणतात. कारण ायान कडून रक्त हृदयापर्यंत पोहोचण्याचा कार्य हे पोटऱ्यांचे स्नायू करतात. बैठक पद्धतीमध्ये ह्या पोरांवर व्यवस्थित दाब पडतो आणि सहजपणे हे रक्त हृदयाकडे जाते. परंतु दिवसभर खुर्चीवर बसल्यामुळे हे पाय खाली लटकतात आणि ह्या स्नायूंना जास्त कार्य करावे लागते त्यामुळे हृदयावर ही जास्त लोड वाढतो. वज्रासनात बसल्यावर ह्या स्नायूंवर दबाव पडतो गुडघ्यांचा व्यायाम होतो आणि त्यामुळे गुडघेदुखी आणि हृदयाचे आजार कमी होतात.
क्रमशः
डॉ.सुवर्णा पाटील,भडगाव















