मुंबई,(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सध्या सर्वत्र प्रचाराच्या सभा रंगताना दिसत आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे.दरम्यान महायुतीत भाजपमधील बंडखोरांची संख्या सर्वाधिक आहे. आता या बंडखोरांवर भाजपने कडक कारवाई केली आहे. महायुतीच्या उमेदवार असतांना बंडखोरी करून उमेदवारी करणाऱ्या तसेच पक्षाचा आदेश न मानणाऱ्या तब्बल 40 जणांची पक्षांतून निष्कासित केलं आहे.
https://x.com/ANI/status/1853956937626599492?t=i7Pv3deeT3_GpQysCiuYdQ&s=19
भाजपकडून नुकतंच एक अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षशिस्त आणि अनुशासन भंग करणारे कृत्य केले आहे. ही कृती पक्ष अनुशासन भंग करणारी असून आपल्याला तात्काळ पक्षातून निष्कासित करण्यात येत आहे, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. भाजपने राज्यातील 37 विधानसभा मतदारसंघातील 40 बंडखोरांवर कारवाई केली आहे. पक्षाचा आदेश डावलून शिस्तभंग केल्याबद्दल या नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. महाराष्ट्र कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी हे परिपत्रक काढले आहे.
- धुळे – श्रीकांत करर्ले, सोपान पाटील
- जळगाव – मयूर कापसे, आश्विन सोनवणे
- अकोट – गजानन महाले
- वाशिम – नागेश घोपे
- बडनेरा – तुषार भारतीय
- अमरावती – जगतीश गुप्ता
- अचलपूर – प्रमोद गडरेल
- साकोली – सोमदत्त करंजेकर
- आमगाव – शंकर मडावी
- चंद्रपूर – ब्रिजभूषण पाझारे
- ब्रह्मपूरी – वंसत वरजुकर, राजू गायकवाड, आतेशाम अली
- अमरखेड – भाविक भगत, नटवरलाल अंतवल
- नांदेड – वैशाली देशमुश, मिलिंद देशमुख, दिलीप कंदकुर्ते, सुनील मोरे, संजय घोगरे
- घणसांवगी – सतीश घाटगे
- जालना – अशोक पांगारकर
- गंगापूर – सुरेश सोनवणे
- वैजापूर – एकनात जाधव
- मालेगाव – कुणाल सूर्यवंशी
- बागलान – आकाश साळुंखे
- बागलान – जयश्री गरुड
- नालासोपारा – हरिष भगत
- भिवंडी – स्नेहा पाटील
- कल्याण – वरुण पाटील
- मागाठणे – गोपाळ जव्हेरी
- जोगेश्वरी – धर्मेंद्र ठाकरू
- अलिबाग – दिलीप विठ्ठल भोईल
- नेवासा – बाळासाहेब मरकुटे
- सोलापूर – शोभा बनशेट्टी
- अक्कलकोट – सुनिल बंडकर
- श्रीगोंदा – सुवर्णा पाचपुते
- सावंतवाडी – विशाल परब









