सावधान!… तुम्ही स्वयंपाक घरात जे तूप वापरतात ज्याला आपण (डालडा) देखील म्हणतो ते तूप म्हशी आणि रेड्याच्या चरबीपासून तर बनवले नसावे अशी शंकाच मनात येणे साहजिक होईल कारणही तसंच आहे ही बातमी वाचल्या नंतर तुम्ही स्वयंपाक घरात वापरत असलेले तूप नक्कीच खात्री करून वापराल हे मात्र खरं…कारण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी संतापजनक बातमी मुंबईच्या भिवंडी मधून आली आहे.म्हशीच्या आणि रेड्याच्या चरबीला वितळवून त्या चरबी पासून तूप बनवण्याचा कारखाना सर्रासपणे सुरु असलेला कारखाना महानगर पालिका प्रशासने छापा टाकत उद्धवस्त केल्याने धाक्काचं बसला.
भिवंडीतील इदगाह साल्टर हाऊस मध्ये होता कारखाना
भिवंडी शहरातील खाडीलगतच्या ठिकाणी असलेल्या इदगाह साल्टर हाऊस येथे म्हशी व रेड कापल्यानंतर त्यांचे अवशेष आणून त्यामधील चरबी वितळवून त्यापासून बनावट तूप बनवून ते शहरातील व शहराबाहेर असलेल्या छोट्या मोठ्या खानावळी, हॉटेल व्यवसायीक यांना विक्री करीत मोठा व्यवसाय थाटला होता.दरम्यान या बाबतच्या तक्रारी मनपा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या नंतर आयुक्त अजय वैद्य यांच्या आदेशाने पर्यावरण विभागाचे नियंत्रण अधिकारी सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव यांनी मंगळवारी पालिका आपत्कालीन विभागाच्या पथकासह घटनास्थळी छापा मारून तेथून मोठ्या प्रमाणावर बनावट तुपाचे डबे तूप बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
म्हशी आणि रेडे कापल्या नंतर त्यातून निघालेली चरबी या तुपाच्या कारखान्यात आणल्या जात होती, चरबीला वितळवून त्या पासून बनावट तूप तयार करण्यात येतं होतं.कारखानदारांनी नागरिकांच्या जीवाशी खेळ चालवला होता. मनपा प्रशासनाने छापा टाकला त्यावेळी कापलेले म्हशी, रेडे प्राण्याचे अवशेष व चरबीचा साठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. परिसरातील व ज्या ठिकाणी सदर तूप विक्री होतं होते त्या ठिकाणी मोठा संताप व्यक्त होतं आहे.दरम्यान एबीपी माझा या वृत्तवाहिनीने या बाबत सविस्तर वृत्त दिले असून खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही व्हिडीओ पाहू शकता.
इतर बातम्या वाचा